जी ले जरा... (२)



पुन्हा ढग दाटून येतात... पुन्हा आठवणी जाग्या होतात... [पाऊस आला की सौमित्र च्या "गारवा"च्या ओळी आपसूक डोक्यात घोळायला लागतात...]
पावसाळ्यातील एक आठवण पुन्हा जागी झाली... सुखद आठवणी पडून गेलेल्या पावसाच्या गारव्यासारख्याच असतात नाही?? अंगभर सुखद गारवा लपेटून टाकणार्‍या... गात्रा गात्रांना तजेलदार करणार्‍या... स्वतःतच रमवणार्‍या...

आज डोअरला उभी होते.. पावसाचे थेंब चेहर्‍यावर झेलत आले... [नकळत मागच्या एका लेखात लिहीलेल्या पावसाचे थेंब चेहर्‍यावर झेलणार्‍या "वेड्या मुली"ची आठवण भिजवून गेली. आज आजूबाजूच्या मला "वेडी" म्हणाल्या असतील...] कानात हेडफोन्स खुपसलेले... "सुहाना सफर" रेडीओवर सुरू... अन्नू कपूरचं परीपक्व, धीरगंभीर रसाळ सूत्रसंचालन... विषय... मधुबाला!! अशक्य स्वप्नाळू काँबीनेशन!! सुरेल सुरावटींचं मध थेंब थेंब कानात झिरपत.. आत आत सरकत जातं हृदयापर्यंत... कृष्णधवल चित्रफित स्वप्नाळू डोळ्यांसमोरून लडीवाळ पणे रांगू लागते... मधुबालाचे अल्लड, लाडीक भावविभोर विभ्रम... स्वप्नांतून जागी होतंच नाहीये मी... 





पुन्हा पाऊस पडतोय... मस्त खरपूस मातीचा वास... चहाच्या गरम कपात बुडवून चाखलेला!! अहाहा मला सांगा सुख यापेक्षा काय वेगळं असतं? आजच्या "सुहाना सफर", अवेळी आलेल्या पावसाने खरंच माझा पंधरावीस मिनीटांचा सफर सुहाना करून टाकला. पोहोचल्यावर हातात पडलेला गरमागरम ताज्या चहाचा कप... त्यात मिसळलेला मातीचा खरपूस वास...!! माझा "आज" या स्वप्नाला समर्पित!!
नाहीतरी जावेद अख्तर यांनी म्हटलंच आहे... "हर पल यहाँ, जी भर जियो... जो है समाँ... कल हो ना हो..."|


............................................................2..b...Continued.............................................................. 

0 comments:

Post a Comment